|| या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा।।

दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ

दि एज्युकेशन सोसायटी, अंबरनाथ या संस्थेने सन २०२६ साली ९० व्या वर्षात पदार्पण केले आहे. अशा नामांकित संस्थेला जेव्हा ९० वर्षे पूर्ण होतात तेव्हा ती घटना केवळ संस्थेसाठीच नाही तर संपूर्ण शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. कारण एखाद्या संस्थेचा ९ दशकांचा प्रवास म्हणजे या दीर्घ कालखंडातील समाजाच्या पर्यायाने शहराच्या जडणघडणीचा चालता बोलता ज्वलंत इतिहास असतो. तसेच तो वर्तमानातील ध्यास तर भविष्यातला विश्वासही असतो. गेली ९० वर्ष दि एज्युकेशन सोसायटी, अंबरनाथ ही संस्था ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे. आपल्यापाशी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे जीवन खऱ्या अर्थाने घडवत आणि संपन्न करीत, ही ज्ञान सरिता अखंड वाहत आहे. तिचे पात्र दिवसेंदिवस आणि वर्षानुवर्ष अधिक विस्तीर्ण आणि सखोल होत आहे. या शुभंकर प्रवाहाचा उगम अंबरनाथ नगरीत झाला ते वर्ष होते - सन १९३६ आणि ज्यांच्या द्रष्टेपणामुळे ही ज्ञानगंगा वाहती झाली; ती व्यक्ती होती ऋषितुल्य कैलासवासी पुरुषोत्तम वासुदेव तथा भाऊसाहेब परांजपे! सन १९२२ मध्ये विज्ञान शाखेचे पदवीधर असलेले भाऊसाहेब नोकरीनिमित्त अंबरनाथ शहरात वास्तव्यास आले. इथल्या धरमजी मोरारजी केमिकल कंपनीत ते मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्या काळात कोहोजगाव- खूंटवली या परिसरात लोकल बोर्डाची इ. ४ थी पर्यंत एकच शाळा होती. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी कल्याणला जावं लागे. त्याकाळी शाळकरी मुलांसाठी ते सोपे नव्हतं. कारण अंबरनाथला तेव्हा रेल्वेचा प्लॅटफॉर्मही नव्हता. शिडीच्या सहाय्याने लोकलचा डबा चढावे/ उतरावे लागत असे. रोजची अशी कसरत पार पाडत शिक्षणासाठी कल्याणला जायचं किंवा शिक्षण अर्धवट सोडायचं एवढा एकमेव पर्याय! शिक्षणाबद्दल मनस्वी आस्था असलेल्या भाऊसाहेबांना ही परिस्थिती अस्वस्थ करीत होती. परंतु त्यांची ही तळमळ केवळ भावनिक नव्हे तर चिंतनशील आणि कृतीशील होती. ही परिस्थिती पालटण्यासाठी काय करता येईल? याचं चिंतन त्यांनी केलं आणि याचच दृश्य फलित म्हणजे - दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ. सन १९३६ मध्ये भाऊसाहेबांनी आपल्या समविचारी मित्रांसमवेत संस्थेची स्थापना केली आणि अंबरनाथच्या शैक्षणिक प्रगतीचा एक नवा अध्याय सुरु झाला. संस्थेच्या माध्यमातून सन १९३६ साली संस्थापक भाऊसाहेब परांजपे, अध्यक्ष डॉ. बी. जे. छाया आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या पुढाकाराने, अंबरनाथ शहरात २२ विद्यार्थ्यांच्या सहवासातून पहिले माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात आले. डी.एम.सी. कंपनीने भाऊसाहेबांना दिलेल्या प्रशस्त बंगल्यात ही शाळा भरु लागली. आणि शाळेचे नाव ठरले - दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथचे, न्यू इंग्लिश स्कूल. शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते श्री. नि. अ. कोरडे. सन १९४६ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी अंबरनाथमध्ये आले होते. म. गांधींजींचा प्रेरक सहवास शाळेला लाभला. त्या पवित्र क्षणांची स्मृती जपली जावी म्हणून पुढे न्यू इंग्लिश स्कूल ऐवजी महात्मा गांधी विद्यालय असे नामकरण करण्यात आले. ध्येयनिष्ठ संस्थाचालक, शिस्तप्रिय मुख्याध्यापक, ज्ञानवंत-गुणवंत शिक्षक, जागृत पालक आणि जिज्ञासू विद्यार्थी यामुळे महात्मा गांधी विद्यालय लवकरच नावारूपाला आले ते आजतागायत! दहावीनंतर अंबरनाथ शहरातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची गरज म्हणून सन १९७५ - ७६ साली इयत्ता ११ वी चे वर्ग सुरू करण्यात आले. ज्याद्वारे कनिष्ठ महाविद्यालयाची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. विज्ञान आणि वाणिज्य शाखेतून विद्यार्थी ज्ञान संपादन करु लागले. तत्कालीन परिस्थितीत झपाट्याने होणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे कुशल कामगारांच्या निर्मितीची गरज म्हणून सन १९८६ साली दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक (टेक्निकल) विषयाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये सुरुवातीला फिटर आणि वायरमन हे कोर्सेस शिकविण्यात येत होते. कालांतराने काळाची गरज म्हणून १९८९ पासुन Elements of Electrical and Electronic Technology या विषयाचे ज्ञान विद्यार्थी मिळवू लागले. सन २०१२ पासून Electrical Technology हा विषय टेक्निकल विषय म्हणून शिकविला जात आहे. टेक्निकल विषय घेऊन आतापर्यंत शाळेचे हजारो विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च पदस्थ म्हणून काम करीत आहेत. ही देखील शाळेच्या दृष्टीने अभिमानाची बाब होय. हे विशेष!


महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ (प)

Data Awaiting

Gallery

गॅलरी



Pride Of Mahatma Gandhi Vidyalaya

आमचे मानबिंदू


Why select Mahatma Gandhi High School?

महात्मा गांधी विद्यालय का ?

शैक्षणिक क्षेत्रात एक विशिष्ट ध्येय उद्दिष्ट ठेवून एक छोटसं बीज १ मे १९३७ रोजी डोंबिवली शहरात रोवले गेले. पाहता पाहता रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव पार करून शताब्दी कडे वाटचाल होत आहे.

भौतिक सुविधा
  • अध्ययनासाठी विशेष सॉफ्टवेअर
  • संगीत प्रेमींसाठी नादब्रह्म संगीत विद्यालय
  • सुसज्ज संगणक कक्ष
  • अत्याधुनिक दृकश्राव्य कक्ष
  • डिजिटल बोर्ड सह गणित प्रयोगशाळा
  • प्रत्येक वर्गात अत्याधुनिक तंत्रज्ञानासह स्मार्ट डिजिटल बोर्ड
  • विज्ञान विषयांतर्गत तिन्ही शाखांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा
  • विद्यार्थ्यामध्ये चिकित्सक व तार्किक विचार वृद्धिंगत करण्यासाठी टॉयलॅबची व्यवस्था
  • विद्यार्थ्यांसाठी कॅन्टीन शालेय पोषण आहाराची व्यवस्था
  • विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पेयजल
  • मुला मुलींसाठी प्रशस्त स्वच्छतागृह
  • सुसज्ज ग्रंथालय
  • वर्गात पुरेशी प्रकाश व्यवस्था व ध्वनी व्यवस्था
  • प्रत्येक वर्गात तसेच शालेय परिसरात सीसीटीव्ही व्यवस्था
शैक्षणिक सुविधा
  • अनुभवी तंत्रस्नेही शिक्षक
  • सहशालेय उपक्रमांचे आयोजन
  • बही:शालेय स्पर्धा परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन
  • विविध बही:शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये निकालाचे सातत्य
  • GST संदर्भात NSDCL CERTIFIED कोर्सची सुविधा
  • NSQF अंतर्गत तंत्रज्ञान विषयाचे प्रभावी शिक्षण
  • मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत शाळेला अंबरनाथ तालुक्यातून तृतीय क्रमांक
  • नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अध्ययन अध्यापन प्रक्रिया
  • राज्य शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी मा. मुख्याध्यापक यांची सुकाणू समितीत महत्त्वपूर्ण भूमिका
  • दहावी बारावी बोर्ड परीक्षांमध्ये शाळेची निकालाची परंपरा
  • विद्यार्थी व पालकांसाठी मुक्त वाचन कोपरा / कट्टा
कला क्रीडा सुविधा
  • प्रशस्त मैदान व क्रीडा साहित्य
  • प्रशस्त मोठे सभागृह
  • पार्किंग सुविधा
  • पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकच्या मुला मुलींसाठी आधुनिक साधनांसह प्लेग्राउंड
  • चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट चे वर्ग
  • सर्व क्रीडा साहित्यासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व बाह्य खेळांच्या स्पर्धांमध्ये समावेश
  • स्काऊट गाईड यासाठी विद्यार्थ्यांचा समावेश
  • हणे व निलेश कुलकर्णी याच शाळेचे माजी विद्यार्थी)
  • माजी विद्यार्थी
  • माजी विद्यार्थी संघाचे भरघोस अर्थसहाय्य

  • Testimonials

    प्रशंसापत्र